हेमंत दिनकर सावळे - लेख सूची

काळ बदलत आहे…!

अलीकडे माणसं होतायेत निकामी भेसूर चेहरे अडकताहेत तंत्रज्ञानाच्या महाकाय जाळ्यात… गतिमान होणाऱ्या काळात धर्मांधतेच्या वाळवंटात पाय रुतून पडलेत.. ऑक्सिजन झालाय गढूळ! हवेतील समानतेचा ओलावा होतोय जहरी.. मेंदू झोपलेत, डोळे बंद आहेत ही प्रतिकृती होऊन बसलीय शत्रू सारं अगदी चिडीचूप फक्त आदेश घेणे…पुढे जाणे… हे हात पडलेत गळून सौंदर्यमुद्रा होतेय अंधूक…. धूसर गर्भबीजांवर होतंय अतिक्रमण माणूस …

ओॲसीस

मूळं वाळवंटातही रोखून धरतात ओलावाजीवघेणं ऊन सोसूनहीटिकवून ठेवतात अस्तित्वमातीशी घट्ट नातं जोडूनशोधू पाहतात ओॲसीस विस्तारणाऱ्या मुळांना माती नाही अडवतदोघेही असतात गुंतलेले आभाळही नाही थांबवत वाढणाऱ्या फांद्यांनासारं घडतं आपल्याच अवतीभवतीतरी माणसाची नजर खुंटलेलीच…! जि. वाशिममो. 7875173828

काळ बदलत आहे

१. जेव्हा केव्हा हुकमती राजवटीने मोडू पाहिला लोकशाहीचा कणा फिरवून टाकल्या सत्तेच्या दिशा पुसटश्या उजेडालाही झाकोळून टाकण्याच्या वाटल्या खिरापती तेव्हाही या जुलुमशाहीच्या आखाड्यात कोणीतरी लढत होतंच आणि आता शेतकरी आहेत…! २. तू आहेस म्हणून काटेरी सत्तेला प्रश्नांनी देता येतात तडे बेबंदशाहीच्या सिंहासनाची उखडता येतात पाळंमुळं जेव्हा कधी नाकारला गेला जगण्याचा हक्क तेव्हा तेव्हा नव्याने पुकारला …

सूर्याने उजाडलंच पाहिजे…!

विधवा असणं….खडक फोडून पाणी काढल्यासारखंपाण्याचा मागमूस नाहीउभं पीक डोळ्यांदेखत जळावंनुसतं जळत जावं सदाहरित वृक्ष दुष्काळात करपणंकरपल्यालं खोडंही ओरबाडून टाकणं विधवा असणं….म्हणजे आतल्या आत सोलत जाणंकुठेच थांबा नाहीशेवटचं ठिकाणही नाहीमनसोक्त आनंद लुटावा असा कॅनव्हासही नाहीकोरड्या बारवमध्ये पोहत सुटायचंपाण्याचा गंधही नाही… विधवा म्हणजे….असतो एकटीचा प्रवासमाघार नाहीच नाहीपुढेही अंधार पाचविला पुजलेलाभयाण स्वप्नांचं घर असते विधवा…तिला दार नाहीखिडक्या तर …

रेषा आणि कविता…!

१ अंधारात भविष्य शोधतानामी मेंदूला ठेवत असतो कोंडूनमनगटातील बळ विसरून दाखवत फिरतो हाताच्या रेषा वाळूचे कण रगडण्याचे सोडून दिसरात जपतो दगडाचे नाव घाम गाळायच्या ऐवजी देत असतो ग्रह-ताऱ्यांना दूषणं तरीही,निघाला नाही कुठलाच प्रश्न निकाली…! २ सीमेवर शत्रू उभे ठाकले असताना राजा शांतपणे करत होता यज्ञ शत्रू महालाजवळ आले असतानाही राजा करत राहिला मंत्रांचा जाप पराभवाची फिकीर सोडून तो देत राहिला जांभई शेवटी बंदिस्त झाल्यावर, “छाटण्यात यावे माझे हात” अशी याचना …

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो तुमच्यातून जात नाहीत आरपार किरणंनसतो तुम्हाला कुठल्याच जाणिवेचा मागमूसचामडी वाचविण्याच्या नादात असता मश्गूल उजेडाला फाटे देऊनगुंडाळून घेता अंधाराचं कवचवर्तमान नाही भूतकाळासारखाभविष्य नसेल वर्तमानासारखेमग काळोखाच्या दरवाज्याआडकुठल्या पिढीचं भविष्य दडवून ठेवलंय? गुलाम संस्कृतीच्या लोकांनोषंढपणाच्या बाजारात लागेलही तुमचा वाढीव भावतरीही बुधवारपेठ, कामाठीपुरा किंवा गंगा-जमुनामधीलभाकरीचं मोल नसेल तुमच्या घरंदाजपणाला एकवेळ काळोखातून उजेडात आले तरीहीअंधाऱ्या खोलीची ओढसोडता सोडवत …

थांबा, पुढे गतिरोधक आहे

दोन डोळ्यांसाठी दोन चष्मे असतात सताड उघडेअंतर्वक्र आणि बहिर्वक्रडोळे शाबूत असले तरीहीडोळसपणाची पैदास सोडत नाही रंगाच्या भिंती घराला माझ्या कुठलाच रंग शोभत नसला तरीहीमी चोरतो आभाळाची निळाईनिसर्गाची हिरवाईमातीला घट्ट पकडून असलेला काळसरपणाबेरंगी पाणेरीही वाटतो अगदी जवळचा बाजारात दाखल झाल्यावर रंग धरतात आपापल्या वाटाआणि चालू पाहतात सोडून महावृक्षाच्या मुळ्या अजून तरी आभाळाने, निसर्गाने, मातीने, पाण्यानेसोडले नाहीत …

देश महासत्ता होतो तेव्हा…!

देश महासत्ता होतो तेव्हानांगरं चालवावीच लागतातशेतं पेरावीच लागतातजागली कराव्याच लागतात आदिमानवाने सुद्धा हेचं केलं बलाढ्य काळ लोटूनसुद्धा आपणही तेच करत आहोतमग देश महासत्ता झाला कसा ? उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या जमाती सत्तेला पुरवत असतात रसदबंदुकीचा चाप ओढूनडांबू पाहतात काळ्याकुट्ट अंधारातजगवणाऱ्या मातीला वांझ संबोधूनपोशिंद्याला करू पाहतात हद्दपार ते गोचीडासारखे बसतात चिटकून आणि पिढ्यानपिढ्या शोषत असतात रक्तबांधावरील शेवटच्या झाडाला कापून ते …